चेअरमन
सप्रेम नमस्कार !
" ग्राहकांचा विश्वास हेच आपलं भांडवल " , अशी शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्थेची नेहमीच धारणा राहिली आहे. अडचणीच्या प्रसंगी सभासदांना आर्थिक आधार देतानाच , विविध लाभदायी योजनांतून ग्राहकांच हित जपण्यांच कार्य देखील संस्था नेटाने करत आहे.
१९९७ पासून सुरू असलेले ही व्रतस्थ वाटचाल , आता एका नव्या वळणावर येऊन ठेपलीय. डिजिटल तंत्रज्ञानाचा अंगीकार करून आपली संस्था अत्याधुनिक सेवा - सुविधा प्रधान करण्यात औरंगाबाद जिल्ह्यात अग्रेसर आहे , याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सातत्याने उत्तम कामगिरी बजावून वेगाने शाखा विस्तार करताना , संस्थेने १०० कोटीचे लक्ष्य निश्चित केले आहे.
दर्जेदार बँकिंग सेवा प्रदान करण्याबरोबरच , शालिवाहन कडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. रक्तदान व मोतीबिंदू क्षस्त्रक्रिया शिबिर , मोफत वैद्यकीय तपासणी , रुग्णवाहिका अशा विभिन्न सेवांद्वारे ग्राहक तसेच सामान्य नागरिकांच्या आरोग्य - सवर्धंनासाठी निष्ठापूर्वक प्रयत्न केले जातात. संस्थेबरोबर असलेले आपले विश्वासाचे बंध आधिक बळकट होऊ देत , अशी मी आशा करतो.
आपल्या सदिच्छा नेहमी आमच्या सोबत आहेत व राहतील , याची मला खात्री आहे!